लग्नासाठी मुलगी पाहायची म्हटली की तिचं रंगरूप, शिक्षण, नोकरी, तिला काय काय येतं ते पाहतात. पण आचार्य चाणक्य यांनी आणखी काही गोष्टी पाहायला सांगितल्या आहेत. हे गुण असलेल्या महिला भाग्यशाली असतात. लग्नानंतर पतीचंही भाग्य उजळवतात, असं चाणक्यनीतीमध्ये म्हटलं आहे.
धार्मिक - धार्मिक व्यक्ती कधीच चुकीच्या मार्गाला जात नाही. अशा व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं.
शांत - राग माणसाचा शत्रू आहे. अशा व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्या स्त्रीला राग येत नाही, ती शांत असते अशा स्त्रीशी लग्न केल्याने नशीब बदलतं.
सन्मान आणि प्रेम - मोठ्यांचा सन्मान आणि लहानांना प्रेम देणार्या महिलेशी विवाह म्हणजे भाग्योदय. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)